Saturday, 20 August 2011

मैत्रिणीनो

मैत्रिणीनो आज जरा आपल्या विश्वा बद्दल बोलायला आले आहे ,मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आले आहे .आपण आयुष्यात अनेक नात्यांना किती सहजतेने सामोरे जातो ना ?प्रत्येक नात्यासोबत नवीन भूमिका, नवीन अनुभव ,नवीन आव्हान पेलत असतो आपण .आणि हे करताना सगळ्या कुटुंबाला पण धरून ठेवायचं असत .ही सगळी तारेवरची कसरत करताना आपल्याला किती अडचणींना सामोरे जाव लागत ,किती तरी प्रसंगी मनाची घुसमट होत असते .पण हे सागायचं कोणाला ?त्यासाठी विश्वास पात्र व्यक्ती तर हवी ना जवळ आपल्या .
पण आता तस नाही होणार आपण एकमेकींशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत .काय सांगाव तुमच्या काही प्रसंगातून कोणाला स्फूर्ती मिळेल ,किवा काही जणींना त्यांच्या समस्येचे उत्तर मिळेल .तसच आपण वयाच्या ४० शीत येतो तेव्हा परत वेगळ्या समस्या येतात ,शारीरक ,मानसिक जडणघडण बदलत असते .मूल मोठी झालेली असतात ,नवरा त्याचा कामात गुंतलेला असतो खूप एकटेपणा जाणवतो ,तेव्हा मागे वळून बघितलं की जाणवत की अरे सगळ्यांच्या जवाबदारया पार पडताना आपण आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या विसरून गेलो आहोत .पण ठीक आहे अजूनही वेळ गेली नाहीये बरंच काही करता येण्यासारख आहे .
तुम्ही मला सांगू शकाल काय कराल ते ?तुमचे अनुभव शेअर कराल ?या तर मग एक नवीन विषयाला हात घालूया आणि बघुया काय निर्माण होत आहे ते .

No comments:

Post a Comment